Tuesday, April 23, 2013

समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी


समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी
डॉ. माधवी संजय महाजन
madhavimahajan17@gmail.com
प्रस्थानत्रयी :
                
               समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी पाहण्यापूर्वी मुळात प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहणे गरजेचे आहे. प्रस्थान म्हणजे मार्गाला निघणे. भारतीय तत्वज्ञानात ‘ब्रह्म हेच अंतिम सत्य’ सांगितले आहे. मानवी जीवनाचे मुख्य उद्दिष्ट परमेश्वर प्राप्ती हेच आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे हे वेदान्ताचे तीन प्रमुख ग्रंथ आपल्या उपयोगी पडतात. या तीन ग्रंथाना प्रस्थानत्रयी असे म्हणतात. संपूर्ण जगतामध्ये परमेश्वर भरून राहिला आहे परंतु मायेमुळे आपल्याला त्याची जाणीव होत नाही. त्यामुळे नाशवंत असा हो प्रपंच तोच आपल्याला सत्य वाटू लागतो. या अज्ञानातून जीव मुक्त व्हावा त्याला परमात्म्याचे समग्र ज्ञान व्हावे याचे नेमके मार्गदर्शन या ग्रंथामधून मिळते.
               
               वेदान्त दर्शनाच्या प्रस्थानत्रयीपैकी एक उपनिषद हे होय. उपनिषदामधील तत्वचिंतन मुक्त स्वरूपाचे आहे. तर ब्रह्मसूत्रांमध्ये वेदांताची सुसूत्र, न्यायसंमत मांडणी केली गेली आहे. उपनिषदांमधील तत्वचिंतन सामान्यजनांना समजेल अशा भाषेत मांडणी केलेली तसेच या तत्वज्ञानाचा आपल्या जीवनाशी असणारा संबध स्पष्ट करणारी भगवद्गीता हे वेदान्ताचे तिसरे प्रस्थान मानले जाते. उपनिषदे ही श्रुती प्रस्थान, भगवद्गीता स्मृती प्रस्थान तर ब्रह्मसूत्रे ही न्याय प्रस्थान आहेत.
               
               या ग्रंथावरील भाष्य, भाष्यटिका इत्यादि ग्रंथातून वेदांत दर्शनाची सविस्तर चर्चा केली गेली आहे. जीवनाचे निश्चित ध्येय गाठण्यासाठी कोणत्या मार्गाने कसे जावे याचे अचूक मार्गदर्शन केले आहे. परंतु यामधील तात्विक चिंतन व क्लिष्ट मांडणी यांमुळे हे ग्रंथ समजायला कठीण जाऊ लागले. सुत्र्रुपात मांडलेला हा विषय अत्यंत गहन असल्यामुळे सामान्य माणूस वेदान्तापासून दूरच राहिला.
                
              खरे तर वेदांतामध्ये मानवी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले गेले आहे . आनंदी जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र वेदांताने दिला आहे. अव्दैताला महत्व देऊन विश्वावर आपलेपणाने प्रेम करा अशी व्यापक विचारांची शिकवण यामधून दिली गेली. भौतिक जगात जगताना शाश्वत सुखाच्या उगमापर्यत पोहोचवणारी विचारधारा या संस्कृतीने दिली. ॠषीमुनींनी शाश्वत सुखाची प्रचिती घेतली आणि हा आनंद सर्वांपर्यत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहीले. ते केवळ अव्दैतात रमले नाहीत तर सर्व जगाशी एकरुप झाले. यामध्ये सांगितलेल्या तत्वाप्रमाणे आचरण केल्याने मनुष्याचे कल्याण साधले जाते. हे नेमके ज्याला कळते तो प्रपंचात आणि व्यवहारात यशस्वी होतो. त्यालाच खरी शांती व समाधान प्राप्त होते. हे जीवन रहस्य शिकविणारी ही प्रस्थानत्रयी आहे.
               
समर्थांची प्रस्थानत्रयी :
                
              शाश्वत सुखाचा मार्ग मनुष्याला वेदांनी दाखविला. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने तो उलगडून दाखविला आणि भारताला लाभलेल्या संत परंपरेने तो मार्ग सामान्य माणसाला सोपा करुन दाखविला. समर्थ रामदासस्वामींनी देखील आपल्या ग्रंथामधून वेदांताच्या याच विचारांचा पाठपुरावा केला. सहज, सोप्या भाषेत त्यांनी हे तत्वज्ञान आपल्या समोर मांडले. समर्थांची वाड्मय संपदा विपुल आहे. यापैकी समर्थांचा श्रीमद दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम हे तीन ग्रंथ समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. श्रीमद दासबोध हा श्रुती प्रस्थान, मनाचे श्लोक स्मृती प्रस्थान तर आत्माराम न्यायप्रस्थान आहे.            

श्रीमद दासबोध :
               
             श्रीमद दासबोध, २० दशक आणि २०० समास असे स्वरुप असणा-या या ग्रंथात ७७५१ ओव्या आहेत. प्रत्येक दशकातील १० समासांमध्ये एक सूत्र पकडून समर्थांनी तो विषय विस्ताराने मांडला आहे. स्तवनाने प्रारंभ करुन समर्थ आत्मज्ञानाच्या खोल गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात. प्रपंचापासून ब्रह्मऎक्य साधण्यापर्यंतचे सर्व विषय समर्थ याग्रंथात हाताळतात. अध्यात्मशास्त्राच्या या ग्रंथामध्ये मानवी जीवाचा उध्दार हा प्रधान हेतू दिसून येतो.
                
            समर्थांचा श्रीमद दासबोध या ग्रंथामध्ये व्यवहाराच्या पहिल्या पायरीपासून परमार्थाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत सर्व काही समाविष्ट झाले आहे. मानवी जीवनातील अज्ञान दूर होऊन त्याच्या जीवनात त्याला पूर्णत्व कसे प्राप्त करुन घेता येईल याचा पाठपुरावा या ग्रंथात केला गेला आहे. जगण्यावर भरभरुन प्रेम करायला शिकविणारा हा ग्रंथ सृष्टीचा मनापासून आस्वाद घ्या पण आसक्त होऊ नका हा संदेश देतो. कारण ही आसक्ती दु:खाचे मूळ कारण आहे. विवेकाच्या आधारे मन ताब्यात ठेवून जीवनमार्ग आक्रमण केला तर निश्चितच सुखी, आनंदी जीवन जगता येऊ शकते.
                
              सर्वसामान्य मनुष्य विषयलोलुप असतो. या भौतिक जगात जगताना सर्व सुखसोयी मिळाव्यात यासाठी झगडत असतो. या सुखांच्या मागे धावता धावता सुखाचा शोध कधीच संपून जातो. केवळ धावणे आणि सुखसुविधा उपलब्ध करुन घेणॆ या गोंधळात सतत कष्ट करत राहुनही तो असंतुष्टच राहतो. सर्व सुखे त्याच्या दारात आली तरी वाढत्या गरजांमुळे फ़क्त असमाधानीच जीवन जगतो. सुखांच्या शोधात धावता धावता मन:शांती गमावून बसतो.
                
            समर्थांनी १२ व्या दशकात सुखी, समाधानी जीवनाचे, मन:शांती प्राप्त करुन घेण्याचे अत्यंत सोपे सूत्र समजावून सांगितले आहे. समर्थांचा प्रपंच करण्याला विरोध नाही. उलट ते म्हणतात,

प्रपंच करावा नेमक । पहावा परमार्थ विवेक ।
जेणे करिता उभय लोक । संतुष्ट होती ॥

प्रपंचातील योग्य कर्म करुन परमार्थ साधण्याची कला समर्थ शिकवितात. हा प्रपंच नेटका करताना नकारात्मक विचारांना मनात स्थान न देता सकारत्मक विचारांवर भर देण्यास समर्थ सांगतात.
               
                नेटका प्रपंच करत असताना परमार्थपण करणे गरजेचे आहे या समजुतीने सकाळी पूजापाठ किंवा नामस्मरण करतो. दासबोधाचा समास वाचतो पण त्याच बरोबर दुस-याची निंदा करणे, दुस-याचे दोष काढणे, राग, तिरस्कार अशा नकारात्मक कृतीपण आपल्याकडून तितक्याच सहजपणे घडत असतात. त्यामुळे आपण धड ना नेटका प्रपंच करत ना धड परमार्थ. या नकारात्मक विचारांचे उच्चाटण करुन सकारात्मक विचारांच्या सहाय्याने नेटकेआणि नेमकेआनंदी जीवन कसे जगता येईल हे उलगडून दाखविणारा श्रीमद दासबोध हा ग्रंथ आपल्याला आपल्या निश्चित ध्येयाप्रत घेऊन जातो.
                
                  सकारात्मक नकारात्मक विचाराविषयी जसे समर्थ या ग्रंथात मार्गदर्शन करतात तसेच जीवाने खरे ज्ञान प्राप्त करून घ्यावे यासाठी समर्थ सर्वांना सावध करतात.  परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून घ्यायचे असेल तर या मायेचा पगडा दूर होणे गरजेचे आहे. या मायेचे वर्णन करताना समर्थांनी मायेला चंचळनदीची उपमा दिली आहे (द. ११ स. ७ ). या रूपकाच्या आधारे मायेचे स्वरूप त्यांनी उलगडून दाखवले आहे. माया म्हणजे काय ? तर जीवाला परमात्म्याचा विसर पडतो ती माया.            मातेच्या गर्भात असताना जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते . पण गर्भामध्ये “ सोहं सोहं ” करणारा जीव जन्माला आल्यानंतर मात्र त्याला देहबुद्धी प्राप्त होते आणि “ कोहं कोहं ” असा आक्रोश हा जीव करायला लागतो. मायेच्या प्रभावामुळे परमात्म्यापासून हा जीव दूर जातो. मी म्हणजे देहच याच भ्रमात तो जीवन जगतो आणि अहं मध्ये बद्ध होतो.  
               
                स्वताचा अहं कुरवाळण्यात आनंद मानणा-या जीवाला या भवसागरातून पार होण्यासाठी मार्ग दाखवतात. मायेत गुरफटलेल्या स्वस्वरूप विसरलेल्या बद्ध जीवाला त्याचे ध्येय गाठण्यासाठी समर्थ मार्गदर्शन करतात. या मायानदीतून पार व्हायचे असेल तर त्याचा उगम ज्याठिकाणी आहे त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करण्याविषयी समर्थ सांगतात. सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणे हा मायेचा स्वभाव आहे . त्याच्या प्रभावापासून वाचण्यासाठी नदीच्या प्रवाहा बरोबर वाहत न जाता त्याच्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊन ब्रह्मामध्ये विलीन होणे हे जीवाचे ध्येय आहे. जे जीव उगमस्थाना पर्यंत जाऊन पोहोचले त्यांची स्थिती कशी होते तर,

‘उगमा पैलिकडे गेले | तेथे परतोन पहिले |
तंव ते पाणीच आटले | काही नाही || द.११.स.७.ओ.२१ ||

या ग्रंथात मोहरूपी मायेपासून अत्यंत सावधपणे जीवाने स्वत:ला बाजूला नेऊन परमेश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करावा याविषयी या ग्रंथात मार्गदर्शन आहे. हेच तत्व आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये देखील ते आपल्याला समजावून सांगतात.

मनाचे श्लोक :
                
               समर्थांचे मनाचे श्लोक ज्यांना विनोबाजींनी ‘ मनोपनिषद ’ म्हणून गौरविले आहे. उपनिषदाचे सार सूत्ररूपाने समर्थांनी यामध्ये मांडले आहे. मानवी मन हे अत्यंत चंचल आहे पण या मनाचा, प्रवृत्तीचा समर्थांनी सखोल अभ्यास केला असल्याचे त्यांच्या विचार सूत्रांमधून आपल्या प्रत्ययास येते. दासबोध ग्रंथामध्ये बद्धा पासून सिद्धा पर्यंत सर्वांसाठी मार्गदर्शन आहे. पण मनाचा श्लोकामध्ये मुमुक्षू पासूनच सुरवात केली आहे. सत पासून जन्माला आलेले मन मूळात सज्जनच आहे. पण कल्पनेमध्ये रमणारे चंचल मन आपल्यामूळ प्रवृत्ती पासून दूर जाऊन इतर गोष्टींमध्येच रमते. आणि अशाश्वत जगात रमलेले मनच जीवाला शाश्वत सुखापासून दूर नेते. हे जाणूनच समर्थांनी या ठिकाणी मनालाच उत्तम विचार करायला प्रवृत्त केले आहे. उत्तम विचार, उत्तम संगत, उत्तम चिंतन मननाची सवय लावून परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी हे सांगणारा हा छोटेखानी ग्रंथ आहे. या श्लोकामधून वेदांताचे सार सूत्ररूपाने समर्थ आपल्या पर्यंत पोहोचवतात.
                
              एकुण २०५ श्लोकांमधून कर्मपर, उपासनापर, ज्ञानपर सूत्र यामध्ये आली आहेत. ‘आधी ते करावे कर्म | कर्ममार्गे उपासना | उपासका सापडे ज्ञान | ज्ञाने मोक्षची पावणे || हे समर्थ शिकवणीचे वर्म आहे. मनाच्या श्लोकांमध्ये कर्मभक्तिज्ञान हा त्रेवेणी संगम पाहायला मिळतो. या श्लोकांचा प्रारंभ नमनाने झाला आहे. स्तवनाच्या श्लोकात समर्थांनी या श्लोकां पाठीमागील भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे ‘गमू पंथ आनंत या राघवाचा’. राघवाच्या या मार्गावर घेऊन जाताना समर्थांनी टप्प्या टप्प्याने मनाचे उदात्तीकरण कसे करावे याचे मार्गदर्शन केले आहे. आनंत राघवाचा हा मार्ग आचरणे सोपे नाही तरीही कठोर परिश्रमाने तो सहज प्राप्त होऊ शकतो. शुद्धज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मानवी मनावर जो अज्ञानाचा पडदा आहत तो दूर होईपर्यंत हे शक्य नाही. खरे तर जीव आणि ईश्वर यामध्ये द्वैत नाही पण मायेमुळे जीवला ईश्वराचे विस्मरण झाले आहे. ‘मी म्हणजे देह’ आणि माझ्यापेक्षा ईश्वर काही वेगळा हा भ्रम जीवाला झाला. परंतु जीवशिव हे एकरूपच आहेत हे एकरूपत्व जाणून घेण्यासाठी जीवाने भक्तिमार्गाचा अवलंब करावा याचे मार्गदर्शन समर्थ यामधून करतात.
                
              समर्थ याठिकाणी मुख्य देव जाणून घ्यायला सांगत आहेत. आत्मा किंवा ब्रह्म हा मुख्य देव आहे आणि हा जाणून घ्यायचा असेल तर प्रथम अहंचा त्याग करणे गरजेचे आहे. देहबुद्धी मध्ये अडकलेला जीव कनिष्ठ देवांमध्ये अडकतो अन मुख्य देवापासून दूर राहतो. समर्थ म्हणतात,

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना |
परब्रह्म हे मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना || १९१ ||

देहेबुद्धि आणि अहंकार हे ज्ञानमार्गातील प्रमुख अडथळे आहेत. मनाच्या श्लोकांमधून समर्थ वारंवार सांगतात की ,

सदा सर्वदा राम सन्निध आहे | मना सज्जना सत्य शोधून पाहे |
अखंडीत भेटी रघुराज योगु | मना सांडी रे मीपणाचा वियोगु || १८६ ||

भगवद्गीते मध्ये सर्वत्र भगवंत व्यापून आहे हे भगवान स्वत: सांगतात तेच सत्य याठिकाणी समर्थ सांगत आहेत. या भगवंताला जाणण्यासाठी देहेबुद्धिचा त्याग कर असे घडले नाही तर आत्मस्वरुपाची जाणीव तुला कधीच होणार नाही.

भ्रमे नाडळे वीत ते गुप्त जाले | जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आले |
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना | जुने ठेवणे मीपणे आकळेना ||१३८||

यासाठीच समर्थ मनाच्या श्लोकात वारंवार सांगतात की विवेके देहेबुद्धि सोडोनी द्यावी, देहेबुद्धिचा आठवू नाठवावा, देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी, देहेबुद्धि हे ज्ञानबोधे तजावी, अशा अनेक श्लोकांमधून देहेबुद्धि सोडायला सांगून परमात्माप्राप्ती करून घेण्याविषयी मार्गदर्शन करतात.     
                
               मनाच्या श्लोकांचे प्रयोजन समर्थांनी स्पष्ट केले ते फलश्रुतीत म्हणतात, मनाची शते ऐकता दोष जाती | मतीमंद ते साधना योग्य होती ||  हे या श्लोकांचे प्रयोजन आहे. या श्लोकांच्या श्रवणाने मतीमंद देखील साधनेस पात्र होतील हा समर्थांचा विश्वास आहे. आणि हे मतीमंद कोण ? तर समर्थ म्हणतात की मतीमंद ते खेद मनी वियोगे| अशा या मतीमंद जीवांसाठी समर्थांनी या श्लोकातून मार्गदर्शन केले आहे. चंचल मनालाच सतत राघवाचा चिंतनात रमायला सांगून स्व:ताचे हित करून घेण्याविषयी विनंती केली आहे. सर्व सुखाचा सागर असणा-या भगवंताला आपले सर्वस्व मानलेस तरच हे मना तुला खरा शाश्वत आनंद प्राप्त होणार आहे हे समर्थ वारंवार मनावर बिंबवत आहेत. मन हे सिद्धीचे कारण आहे . मनाच्या प्रसन्नतेवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत हे जाणून तसेच मनाचे सामर्थ्य ओळखूनच समर्थ मनाला विवेकाने आवर घालून त्याला रामरूपी कसे भरावे याचे मार्गदर्शन करतात. 

आत्माराम :              
               
              समर्थांचा आत्माराम एकुण १८३ ओव्यांचा आणि केवळ ५ समासांमध्ये बांधलेला हा ग्रंथ समर्थांच्या प्रस्थानत्रयी मधील महत्वाचा ग्रंथ आहे. "आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥" असे श्रीसमर्थांचेच शब्द आहेत. यावरूनच परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्व लक्षात येते. वेदांताचे सार एकवटलेला, अध्यात्म विद्येचे गुह्य प्रकट करणारा असा हा ग्रंथ आहे. यामध्ये समर्थांनी परमेश्वर प्रतीचा आनंद व्यक्त केला आहे.
                
                या ग्रंथात समर्थांनी मायेचे यथार्थ वर्णन केले आहे. माणसाला आपल्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यावयाचा असेल तर त्यासाठी मायेचा त्याग करावा लागेल. भगवंताचे कर्तुत्व विलक्षण आहे तसेच ही माया मोठी विचित्र आहे. या मायेमध्ये रमल्यामुळेच माणसाचे मन अस्थिर राहते. माणसाचे मन कायम कल्पनेमध्ये रमून जाते. यामुळे त्याचे मन कधीच एकाग्र होऊ शकत नाही. किंवा निर्विचार अवस्था त्याला कधीच प्राप्त होत नाही.
                
                 मन इंद्रियांच्या पातळीवर विषयसुखाचा विचार करत राहते. तेव्हा ती माया माणसाच्या बंधनास अथवा पुनर्जन्मास कारणीभूत ठरते. पण मनातील विचार भगवंतासंबंधीचे असतील तर हळूहळू हेच मन साधकाला निविर्चार करून ही माया साधकाला बंधनातून मुक्त करण्यास उपयोगी ठरू शकते. त्यासाठी साधकाने एकांतात राहून सतत साधना करणे गरजेचे आहे असे समर्थ सांगतात. अहंकार आणि वासना यामुळे माणूस दृश्य जगातील सगळ्यांना माझे माझे म्हणत राहतो. इतरांकडून अपेक्षा करीत राहतो आणि इतरांच्या अपेक्षापूर्ती करू शकत नाही . अशा या विचित्र चक्रात तो सापडतो आणि या अपेक्षापूर्तीच्या खेळात मनुष्य अधिकाधिक मायेत गुरफटत जातो. या चक्रातून सुटण्यासाठी समर्थ अहंकाराचा आणि वासनेचा त्याग करायला सांगतात.  देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असे सांगून साधना उपासना याच्या माध्यमातून शाश्वत आनंद प्राप्त करून घेण्यास सांगतात.

ऐक ज्ञानाचे लक्षण | ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान |
पाहावे आपणासी आपण | या नाव ज्ञान ||

हेच महत्वाचे सूत्र समर्थ आपल्या प्रस्थानत्रयी मधून सांगतात. चंचल मनाला सारासार विचार, नित्य अनित्य विवेकाच्या आधारे सावरून शाश्वत आनंदाची प्राप्ती करून घ्यावी हेच त्यांचे सांगणे आहे.
                
             समर्थ म्हणतात संसार हा मायेचाच खेळ आहे. या मायेचा निरास मायेनीच करायचा आहे. यासाठी नित्य उपासना यावर समर्थ भर देतात. या मायारूपी जगात वावरताना भक्ती हे साधन समर्थ आपल्याला सांगतात. दासबोधामध्ये समर्थांनी नवविधाभक्ती सांगितली आहे. आत्मारामामध्ये समर्थ म्हणतात,

हेचि जाण भक्तीचे बळ | जेणे तुटे संसारमूळ |
नि:संग आणि निर्मळ | आत्मा होईजे स्वये ||

सगुणाची उपासना करीत नि:संग आणि निर्मळ असे आत्मस्वरूप आपणच आहोत हा अनुभव घेणे हेच भक्तीचे फळ आहे. जेथे मी आणि तू उरतच नाही अशी अवस्था जी नेमक्या शब्दात मांडता येत नाही पण ज्याची अनुभूती घ्यावी अशी ही अवस्था. सर्वोच्च्य आनंद प्राप्त करून देणारी ही अवस्था ज्या आनंदाची प्राप्ती करून घेणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे. हेच ध्येय वेदांमध्ये सांगितले गेले.
                
             आपल्या या प्रस्थानत्रयीमध्ये समर्थांनी वेदाचे जे गुह्य शास्त्रांचे जे सार ते अत्यंत सोप्या शब्दात आपल्या समोर मांडले आहे. त्याचे चिंतन मनन श्रवण करून व निदिध्यास घेऊन साधकांनी शाश्वत आनंद प्राप्त करून घ्यावा .

जय जय रघुवीर समर्थ

               
                  

Monday, January 28, 2013

श्री समर्थ रामदासस्वामी चरित्र


श्री समर्थ रामदासस्वामी
डॉ. माधवी महाजन
      
      संत ही महाराष्ट्राला पालकली देणगी आहे. या सर्व संतानी अमूल्य अशी वस्तुस्थिती आहे. त्यांनी आपले जीवनकार्य मानून समाजाची काही निश्चित उद्दिष्टे निश्चित केली आहेत. स्थिरस्थात स्थैर्य आणण्याचे, तसेच योग्य मार्ग शोधण्याचे, त्यांना भरलेला सर्वा समाजाला या सर्वा धर्माची शिकवण समाजाला मौचेनी संत केले. संत प्रभावळित समर्थ रामदास आपल्या उदाहरणातून उठून.

समर्थ रामदासस्वामी जन्म स.१६०८/ श.१५३० चैत्र शुद्ध ९ या दिवशी. सूर्याजीपंत आणि राणूबाई यांच्या या पुत्राचे नाव 'नारायण' असे होते. बालपणा तिक्ष्णबुद्धी आणि त्यांची विचारांची व्यापकता त्यांची विविधता. 'विश्वाची चिंता' समर्थांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्व:तावलीच्या प्रपंचाकडे पाठ फिरवला. सर्वस्वाचा त्याग करून टाकळी येथे त्यांनी वर्षभर वास्तव केले. बारा वर्षाचा या त्रासात त्यांनी स्व:ताचा शारीरिक, मानसिक, आणि बौद्धिक असा सर्वागीण विकास केला. गायत्री मंत्राचे आणि त्रयोदशाक्षरी मंत्राचे नित्य पुरश्चरण चालू असताना ते सतत सावध होते. त्यांनी आपली चौकस बुद्धी जागृत आत्मा सभोवताली घडणे-या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण चालू ठेवले होते.समाजावर पसरलेले साम्राज्य, प्रतीकाराशून्य बनलेले यासर्वांची त्यांना जेव्हा समाज तेव्हा अखंड भारत पालथा घालण्याचा निर्णय निर्देश करतो. या भारत भ्रमणावर त्यांनी समाजाचे निरीक्षण केले. भयग्रस्त आणि चिंताग्रस्त, देशाची समस्या, तसेच देव आणि धर्मभान येण्यासाठी त्यांनी ही देशा केली.

      तीर्थटन देशांत माजलेला अनाचार त्यांनी स्व:तच्या सैनिकांनी. त्यांचे देशाचे जे विदारक दर्शन घडले त्याचे वर्णन त्यांचे 'अस्मानी - सुलतानी' तसेच 'परचक्र निरुपण' आणि त्यांचे वाड्मया समर्पक इतरत्रते. याशिवाय काही निजला प्रवासवर्णन तुर्तास देशास्थिती प्रकाशो.

समर्थकालीन देशस्थिती : समर्थांचे जीवन त्यांनी जे कार्य केले, समाज घडवून आणली, त्यांनी कोणत्या परिस्थितीला तोंड दिले ती पार्श्व शक्ती समजावून अत्यावश्यक आहे.

समर्थांच्या वेळेचा काल अत्यंत धामधुमीचा होता. त्याची पाळमूळ आपल्याला समर्थपूर्वकालीन परिस्थितीमध्ये आढळतात. आपला धर्म आणि समाज अत्यंत सुखरूप असा होता. आपापस हेवेदावे आणि वैरभाव सोडले तर समाजात भय आणि परकीय सहभागी या दोन्ही समाजाचा मुख्य पोखरलेला. इ.स. ७१२ चा बगदाद्चा खलीफ वालीद आणि इराण सुभेदार यांच्या महमद कासीमने सिंधप्रात पाउल टाकले आणि आपल्या अवनतीला खरी घडे. त्याच्या स्वभावाचे दर्शन घडवल्यावर जनता क्रुतीतून पुन्हा एकदा त्याच्या वर्तणुकीशी जुळते. त्यांच्या या मूळ धर्माचाच प्रसार करण्यासाठी आलेला हा शत्रू हिंदूची प्रतीकाराशून्य प्रवृत्ती लक्षात ठेवा मात्र शिरजोर बनला. त्यांचे दुबळेपणा, आपापसातील संदेश वैर, हेवेदावे, स्वार्थीपणा, यासर्व सर्व शत्रूला आपली पथारी आपल्या देशात बरेच गेले. त्यांच्याकडून देश पोखरून निघाला. समाज नि:सत्त्व बनला.

      हिंदूच्या भावना दुखावल्याची विटंबना केली जात असे. देवतांच्या धातूचा वापर माशिदिच्या या साठी, त्यांच्या पाया-यांसाठी केला जात असे. अनेक देवळांचा, तीर्थक्षेत्रांचा विध्वंस यावनी सत्ताधिका-द्वारे मुक्तपणे चालवला होता. समर्थ दासबोधात म्हणतात,


देव हारपला कंठां | येक देव ने चोरीं |

येक देव दुराचारीं | जास्तिला बलें || ६.६.३४ ||

येक देव जापानीला | एक देव उदकीं टाकिला |

येक देव नेऊन घातला   |  पायातळीं  || ६.६.३५ ||


याशिवाय धर्माला आलेली ग्लानी समर्थांच्या पुढील शब्दातून व्यक्त होते,


देव जाले उदंड | देवांचे मांडलें भंड |   

भूदेवतांचें थोतांड | येकचि जालें || ११.२.२० ||

      

      देवदेवतांविषयीचा हा गलबला होता तर चातुर्वर्ण्यव्यवस्था पार कोलमडून होती. धर्मातील अनाचार, कोलमडली चातुर्वर्ण्यव्यवस्था याविषयीची व्यथा पाठ समर्थांनी शिवरायांना दिलेल्या पत्रांमध्ये व्यक्त केली आहे. ते म्हणतात


तीर्थक्षेत्रे मोडली | ब्राम्हण स्थाने भ्रष्ट लोक |

सकाळ पृथ्वी आंदोळली | धर्म गेला |

     तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होते. ब्राम्हण आणि क्षत्रिय हे जेव्हा उच्चवर्णीय जात होते. ब्राम्हणांनी आपले ब्राम्हण सोडले होते. तर आपल्या धर्माचा क्षत्र होता. ब्राम्हण काय किंवा क्षत्रिय कायनाही परकियांकडे चाकरी करण्यात धन्यता वाटत होती. ज्यांचा आदर्श हॉटेल आपल्या धर्माचे पालन करावे असा वर्गच धर्मभ्रष्ट होता. अशा भरकटलेल्या समाजाला मार्ग शोधण्याचे, सावरण्याचे कार्य समर्थ रामदासस्वामींनी केले.

समर्थांचे कार्य: समर्थ रामदासस्वामीं यांच्या काळाचा सर्वांगीण विचार केला त्यांनी त्या जे समाजकार्य केले ते आश्चर्यकारक होते. त्यांनी त्या धार्मिक राजकीय घडामोडी, आणि सामाजिक उत्सव आणली होती. भारतभ्रमणाच्यावतीने त्यांनी समाजाचे निरीक्षण करून समाजाचे मन जाणून घेतले. याकाळात समाज भयमुक्त संघटीत होणे आवश्यक आहे त्यांनी जाणले. समर्थांनी समाज संघटीत करताना समाजाला ज्ञानसत्ता, राजसत्ता, धर्मसत्ता, आणि आत्मसत्ता या चार सत्ता दृढ करणे. मध्ययुगापूर्वी राजसत्तेपेक्षा ऋषीसत्ता अधिक प्रबळ होती. राजा ऋषींची आज्ञा शिवाय कोणताही निर्णय घेत नाही. राजसत्तेला ज्ञानसत्तेला अधिक प्राधान्य होते. आपल्या खिलजीच्या आघाडीची सत्ता ढासळली ही ज्ञानसत्ता दृढविरहित समाजाला नवा दृष्टीकोण उत्पन्न कोण ? ही समस्या समर्थांनी ओळखली. ब्राम्हणांना अत्यंत शब्दात आपल्या धर्माची रचना करून दिली.

      त्याकाळात ब्राह्मणाचा भाग होता. ब्राम्हणवर्ग आपले कर्मण धनसंचयाचा मागे मागे होता. स्वधर्माचे विस्मरण कार्यकर्ते आणि शोषण ब्राम्हण समाजाचे समर्थांचे कोरे ओढले आहेत. ब्राम्हणांची मुख्य दीक्षा भिक्षा मागणे हे सर्व समर्थांनी त्यांना दिले आहे. ज्ञानसत्ता प्रबळ करण्यासाठी समर्थांनी आपल्या उपदेशाचे संबंध ब्राम्हणांचे मनोबल दृढ केले. तसेच राजसत्ता दृढ करण्यासाठी 'मराठा तितुका मेलवावा | महाराष्ट्र धर्म प्रगतीवा | 'असा उपदेश करून क्षत्रियां मोगलाई विपरीत स्वरूपना. स्वधर्माची स्थापना करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. पण त्यांना योग्य त्या राजाची गरज आहे हे प्रकर्षाने सांगतात. त्यांनी कृष्णाखोऱ्यांची निवड केली. कृष्णाखोरे ही शहजीराजाची जहागिरी होती. तसेच त्यांचे पुत्र शिवाजीराज राज्य राज्याची स्वप्ने उराशी रचनेने त्या ठिकाणी आपली पावले टाकत होते. स्वराज्य स्थिरता शहाजीराजांनी एकदा प्रयत्न केला होता पण त्यांचे हे बंड मोडून काढण्यात आले होते. शहजीराजाची स्वराज्य उर्जा आणि शिवाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न लक्षात ठेवा समर्थांनी आपल्या कार्यासाठी कृष्णाखो-याची निवड केली. त्यांनी आपल्या उपदेशातून समाजाला एक महत्व पटवून दिले. तरुणांची मने शिवाजीराजांची स्वराज्य सक्रिय कार्यपद्धती ठरविणारी अशी घडविण्यास मदत केली. आंदोलनाविरुद्ध शांतता प्रेरणा त्यांनी समाजाला दिली. परकीय आणि मोगल यांच्या सर्वांनी एक त्यांचा अंत करणे ही प्रेरणा राजसत्ता दृढ करणार होती.

   ज्ञानसत्ता आणि राजसत्ता दृढ करताना त्यांनी धर्मसत्ता देखील प्रबळ केली. समर्थांच्या काळामध्ये धर्माला ग्लानी आलेली होती. हिंदूची देवळे पडली जात होती, त्याची विटंबना केली जात होती, या सर्व अनाचाराला प्रतिबंध घालण्यास एकजण येत होता. लोकांच्या भावना अत्यंत हीन दुखावल्या धार्मिक जात असून निर्विकारपणे जनता ते सहन करत होती. समाजाची ही तटस्थ वृत्ती, त्यांचे दुबळेपण आणि यवनांचा अनाचार हे सर्व समर्थांना उघड्या दृश्ये पाहणे होते. त्यांनी भारतभ्रम करत असताना तसेच नंतर मंदिराचा जीर्णोद्धार करून, ठिकठिकाणी मारुतीच्या मंदिराची स्थापना करून धार्मिकमणिच घडवून आणली. श्रीराम मंदिर उभारणी करून त्याचा मोठा उत्सव केला. अनेक वीर मारुती, प्रताप मारुतींची स्थापना करून समाज नंतर निर्भय आणि बलवान मारुतीचा आदर्श ठेवला. हे सर्व जो धर्मीय अनाचार होता त्याला आळा घालण्याचे काम समर्थांनी केले. त्या अंधश्रद्धाचा जो सुकाळ होता तो प्रहर करणे आवश्यक होते. समाजाला शुद्ध परमार्थी आणि खरा धर्म समाजाचे विचार मांडणे हे अत्यावश्यक होते. यासाठी समर्थाचा उत्सव, मंदिरांचा जीर्णोद्धार अशा समाजाला 'चाळणा' समाजाने नवी दृष्टी प्राप्त करून देवाने स्वत्व जगृत जगाचा नवा मार्ग शोधला.

समर्थांचे शिष्य दान :समर्थांनी संपूर्ण मंदिरांची स्थापना आणि देव उत्सव भारताचे प्रकाशन केले नाही तर त्यांनी आपली मठ स्थापना करून त्या शिष्याची महांत म्हणून नेमणूक करून सर्व समर्थ संप्रदाय जाळे पसरवले. समर्थांच्या या कार्यात त्यांचे शिष्याचे योगदान तितकेच परिणाम ठरते. पूर्वी समाजाशी संपर्क साध रेडीओ, दूरदर्शन ,टेलीफोन अशी साधने उपलब्ध आहेत. अशाप्रकारे समर्थांना आपला उपदेश घराघरात पाठवायचा होता. यासाठी त्यांनी अनेक महंत आणि शिष्य तयार केले. समर्थांचे हे शिष्य समर्थांचा उपदेश समाजापारात उपलब्ध असतो. समर्थांनी ब्राम्हणांना जसे भिक्षेचे महत्त्व सांगितले तसेच आपल्या शिष्यांनाही भिक्षेची दीक्षा दिली. कारण भि हे समाज जवळीक साधणारे, लोकाभिमुखतेचे अत्यंत प्रभावी साधन आहे हे त्यांनी जाणले. भिक्ष वाटाघाटी लोकस्थिती ओळखून निरीक्षण करणे हा महत्त्वाचा उद्देश होता.


कुग्रामे किंवा नगरे | पहावी घरांची घरे |

भिक्षामिसे लहानथोर | परीक्षून सोडावी |


यातून समर्थ संप्रदायात भिक्षेला महत्त्व दिले आणि त्याचे व्यापक स्वरूप लक्षात ठेवा.

   समर्थांनी एका विशिष्ट वर्गाचे शिष्य घेतले. त्यांचे काही शिष्य राजकारण देखील होते. या सर्व शिष्य समर्थांच्या देशाचा उपयोग केला. अर्थातच शिवाजी महाराजांचे स्वराज्य कार्यातही त्यांचा उपयोग झाला. समर्थांनी जे शिष्य जमवले होते ते सर्व


वेष बाग बावला | परी अंतरी असाव्या नाना कळा |

असे होते. याचा फायदा करून सुरक्षा नियम काय चालले आहे, काय खबर हे या शिष्यांद्वारे समर्थांना कळत आहे. मठस्थापना, शिष्य, महंत, आणि आपला संप्रदाय प्रश्न जाळे समर्थांनी मागवले होते. जोड त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय .

शिव - समर्थ संबंध :समर्थांनी देवकरण समाजकारण आणि समाजाचे कारण साधले. त्यांचे मुख्य कार्य स्वधर्माचे होते. त्यांच्या या कार्याला स्वराज्य पूर्णत्वासाठी उद्दिष्टाने मार्गदर्शक शिवाजी महाराजांसमोर शिष्याची जोड दिली. शिव – समर्थ या दोन्ही विभूती स्वतंत्र आणि स्वयंभू. धर्मस्थापना आणि स्वराज्यपना यासाठी परस्पर संबंधांची गरज होती. तेव्हाचा कालच असा होता की या दोन्हींचा समन्वय ही काळाची गरज आहे हे राष्ट्री जाणले होते. शिवाजी राजे उत्तम संघटक होते. आपल्या वर्तनातून लोकांने मला विश्वास दिला आहे की ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ तर समर्थ उपदेशातून लोकांची स्वराज्य आणि स्वधर्म या हेतूने आपल्या मार्गदर्शकांनी समाजवादी स्वराज्य निर्माण करून समाज घडवण्यास सुरुवात केली. समाजोद्धार करणे हीच तळमळ उभयतांना संधी होती. काळाची ओळख ओळखून कार्य केले ही गोष्ट अधिक महत्त्वाची होती. आपले कार्य पार पाडताना योग्य प्रकारे कार्याची आखणी करून, उत्तम संघटन करून तसेच सतत सावध राहून समाजहित नजरेसमोर उभे राहून आपापली कार्य केले. प्राप्त परिस्थितीला डगमगून न जातानी अत्यंत सावधपणे, थोडयाच समूहाच्या आधारे आणिंगजेला हादरवून सोडणारी शक्ती दिली.

समर्थाचे हातीपण : समर्थ रामदासस्वामीं त्यांचे सकारात्मक आदर्श होते. त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी समाजवादाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. 'यत्न तो जाणावा', 'केल्याने आहे रे', असे विचार देवधन लोकांना प्रयत्नवादी बनवले. तसेच त्यांनी 'अचूक' प्रयत्न अधिक भर दिला. 'आधी केले मग सांगितले' असा त्यांचा बाणा होता. तसेच या वचनाप्रमाणे त्यांचे वर्तन होते. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' असे सांगून क्रियाला अधिक महत्त्व दिले. ज्या काळामध्ये धार्मिक श्रद्धा उरले आहे त्या काळामध्ये त्यांनी ' सामर्थ्य आहे चळवळी | जो जो करील तयांचे' असे सांगत सतत 'चाळणा' करण्यास प्रवृत्त केले. 'मराठा तितुका मेळवावा | महाराष्ट्र धर्म प्रगतीवा 'असा मोलाचा उपदेश करून मराठीत स्फुरण निर्माण केले. समर्थांनी पोलीस करत असताना तलवार नसली तरीही त्यांनी उपदेशच जास्त प्रखर होता. त्यांच्या शब्दाला विलक्षण अशी धार होती. आपल्या तेजस्वी आणि प्रखर वाणीप्रमाणे त्यांनी आपले शिष्य तयार केले. 'धटासी व्हावे धट | उद्धटासी उद्धट |' अशा प्रकारचे वचना अनुभव जशास तसे वागण्याची शिकवण त्यांनी समाजाला दिली. सत्तेच्या विरुद्ध प्रतिकार करताना सत्ता कार्याची वाटू नये ' समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूभागी कोण आहे |' असा रोकडा प्रश्न टाकून धीर मलाचेही काम केले. एकीकडे सतत चळवळ करण्यास प्रवृत्त आणि भयग्रस्त समाजाला 'धिरधरा तकवा | हडबडू गड्बडू नका |'धीर असा कर्जा हा समर्थ पुरुष लोकांना उपदेश निश्चित वाटला. त्यांचा परिणाम आणि निर्भय उपदेश समाजावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या उपदेशाने मृतवत समाजाची चेतना निर्माण केली. त्यावेळची परिस्थिती होती की स्वधर्म यासाठी काही करावेसे वाटले असे मनी कमकुवत तसेच मनावर कायमस्वरूपी साम्राज्य असलेली जनता सक्षम करू शकत नाही. त्यांच्या मनातील सुप्त इच्छेला समर्थांनी योग्य मार्ग शोधण्याचे मोलाचे कार्य केले.

       समर्थांचा विशेष म्हणजे स्वतः: ब्रह्मचारी राहून त्यांनी सामान्यजनांना 'आधी प्रपंच उघड नेटका|' असा उपदेश केला. त्यांनी स्वत:: प्रपंच थाटला नसला तरी त्यांचे स्वरूप फार व्यापक होते. त्यांनी राष्ट्राचा प्रपंच मांडला होता. हा प्रपंच त्यांनी सावधपणे आणि नेटकेपणाने केला. सामान्य माणसाला प्रपंचाचा त्याग करून परमार्थ साधता येत नाही हे जाणून होते. आपण प्रपंच नेटका करून मगच परमार्थ करण्याचा उपदेश त्यांनी सामान्यजनांना केला. असे असले तरी प्रपंच नासका कसा आहे हे देखील त्यांनी दाखवून दिले. प्रपंचा गुंतून मनुष्यप्राणी कसा त्रास होतो हे सांगताना कसे अलिप्तपणे याविषयी समर्थांनी मार्गदर्शन केले आहे. प्रपंचामध्ये आळस करू नका तो नेटका करा असे सांगताना प्रपंचाच्या आहारी जाऊ नका असे सांगून समर्थ प्रापंचिकांना सावध करतात.

समर्थ संप्रदायाचे स्थान : समर्थ संप्रदायाचे स्थान हे त्यांचे एक संघ वैशिष्ठ्य पक्षाचे स्थान. ज्ञानेश्वर–मुक्ताई, नामदेव–जनाबाई, तुकाराम–बहिणाबाई या स्त्रीशिष्यांचा उल्लेख. समर्थ संप्रदायामध्ये देखील अनेक शिष्य. आक्काबाई, वेणाबाई, द्वारकाबाई, गंगाबाई, अन्नपूर्णाबाई अशा वीस स्त्री शिष्यांचा उल्लेख 'समर्थ प्रताप' मध्ये आढळतो. या शिष्यांनी ग्रंथरचना केली स्त्री. तसेच समर्थ त्यांचा फोटोची भूमिका टाकत असते. आक्काबाई, वेणास्वामी यांना तर मठाधिपती केल्याचा उल्लेख करतो. त्यांना अधिकार प्राप्त करून दिला तसेच गुरुत्वाकर्षणाचा अधिकार नसला तरीही वेणास्वामी केल्याचा उल्लेख करतो. त्याकाळाचा विचार करता त्यांनी आपल्या संप्रदायाचे स्थान दिले, त्यांना अधिकार दिलेले हेडसेचे पाऊल ठरते. जनता देखील त्यांचे प्रमाणपण सिद्ध होते.

समर्थांचे वाड्मय : समर्थांचे वा त्यांचे वाड्मयीन कर्तुत्व देखील तेव्हढेच मोलाचे आहे. त्यांनी धर्मकारण, राजकारणी आणि समाजकारण करताना विपुल वाड्मय उभारणी केली. त्यांची सूक्ष्म निरीक्षणे आणि प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करण्याची कल्पना दर्शन घडते. जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करणारी त्यांची शिकवण होती.

      समर्थ संप्रदायात 'ग्रंथराज दासबोधाचे' महत्व अपरंपार आहे. वीस दशक दोनशे समास आणि ७७५ ओव्या अशी दासबोधाची रचना आहे. या ग्रंथ समर्थांचे अनेक विषय आहेत. प्रपंच, परमार्थ, व्यवहारज्ञान, तसेच ब्रह्म म्हणजे काय ? मायेचे स्वरूप कसे आहे, विवेकाचे आपल्या जीवनाचे महत्त्व या आणि अशा अनेक विषयांना त्यांनी महत्त्व दिले आहे. व्यवहारज्ञान, प्रपंचज्ञान हे सोबतच ब्रह्माचे गूढ देखील अत्यंत अत्यंत त्यांनी उकलून शोधले आहे. देहबुद्धीपेक्षा हेच सर्वस्व हे जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांनी सागितले आहे.   

       श्रीमत दासबोधाप्रमाणे समर्थांचे 'मनाचे श्लोक' हे छोटेखानी पण अत्यंत प्रभावी विचार प्रकट करणारे पुस्तक समर्थांच्या विचारांची व्यापकता स्पष्ट करते. माणसाचे मन हे अत्यंत चंचल आहे. या चंचल मनालाच समर्थांनी सज्जन उपाधी श्रेष्ठ स्थान दिले आणि कोणा व्यक्तीला उपदेश न करता मनालाच सदाचाराचा उपदेश केला आहे. चंचल मानाला आवर फायदा त्या विचारांनी आचरण करावे, पण ते सतत भगवंताचे स्मरण ठेवावे, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. मानाला वळण लावणारे हे लहान थोर मनाचे श्लोक प्रमुख मार्गदर्शक आहेत.

      समर्थांची 'करुणाष्टके' त्यांची रामचंद्राची भेट तळमळ व्यक्त करणार आहेत. आपल्या परम आराध्य दैवता नंतर ही करुणपर कविता म्हणताना जे अष्टत्विक भाव निर्माण करतो, तो या काव्याला करुणाष्टके हे नाव पुढे. या अष्टका संदर्भ मन उदास नेहमीच त्यांचेही 'दाता एक रघुनंदन' असा त्यांना विश्वास वाटतो. अत्यंत कारुण्यपूर्ण अशी काव्य रचना समर्थांचे भावसौंदर्य प्रकट करते. समर्थांची 'भीमरूपी स्तोत्रे' ही अत्यंत स्फूर्तीदायी आणि मार्गदर्शनपर अशीच आहेत. समर्थांनी मारुतीरायांचे वर्णन करणार तसेच त्याचे पराक्रम वर्णन करणार, स्तुती करणारी तेरा मारुती स्तोत्रेली. या स्तोत्र निर् स्फूर्तिच तसेच पराक्रमी मारुतीरायांचा आदर्श शांतं उंच आरामो.

     याशिवाय त्यांचे आनंदवनभुवनी काव्य, लघुकाव्य, पंचसमासी रामायण, आरत्या असे विविध अंगांनी तयार केलेले वाड्मय उपलब्ध आहे. या सर्व वाडमय समर्थांनी आत्मसत्ता दृढ केली. त्यांच्या योगी, ज्ञानीभक्त यांना वेदाच्या संस्कृतीचा प्रसार प्रसारला नाही. त्यांच्यातील ज्ञानभक्त भावच दासबोध या ग्रंथकाराला अधिक प्राधान्य आहे. समर्थांनी आत्मसत्ता दृढ केली त्यांनी अध्यात्म, भक्ती, मोक्ष याला प्राधान्य दिले. 'देहे दुख: ते सुख मानीत जावे' असे सांगून देहाला गौण स्थान त्यांनी आत्मारामाला महत्त्व दिले आहे.

समरोप:समर्थ एकूण ७४ वर्षांचे जीवनवृत्त त्यांचे जीवन म्हणजे एक मीडियाच होती. त्यांनी आपले सर्वस्व स्वत:साठी: वैयक्तिक सुखासाठी व्यतीत न करता लोकोद्धार आणि आत्मोद्धार यासाठी विशिष्ट केले. त्यांनी आपल्या वाड्मयातून, विचारातून समाजाला योग्य तोच बोध केला. त्यांच्या कर्मातला कृतीला अधिक महत्त्व दिले. त्यांना सकारात्मक विचारवंत म्हणावेसे वाटते. समर्थांनी समाजकारण, राजकारणी आणि धर्मकारण असे त्रिविध कार्य केले. त्यांनी नवीन विचार आधीच्या संतांच्या भागवत संप्रदायाच्या आपल्या स्वतंत्र कर्तुत्वाचा ध्वज फडकवला. समाजातील चार सत्ता दृढ करून अचेतन समाजाचे चेतना निर्माण युगप्रवर्तक कार्य केले. जीवनाचा सर्वांगीण विकास करणारे समर्थांचे विचार तीनशे वर्षापूर्वी जसे उपयोगी होते, तसेच आजही तितकेच मोलाचे ठरतात. 'समर्थ्य आहे चळवळी' तसेच 'यत्न तो देव जाणावा' या समर्थांच्या आजही मार्गदर्शक ठरतात. प्रयत्नवादाला देव मानणारे समर्थ आणि आळस झटकून सतत कार्यरत रहाणे-या समर्थांची आजची समाजाची देखील तेव्हढीच गरज आहे.

      लौकिक अर्थाने समर्थबोध आपले नसलेले समर्थ आत्माराम आणि दास या दोन ग्रंथांचे रूपाने आपलेच आहेत, याची ग्वाही खुद्द समर्थच सेना,


माझी काय आणि वाणी | म्हणाल अंत:कारणी |

परी मी आहे जगज्जीवनी | सतत ||

      

      समर्थ आपल्याच राहून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की स्पष्टपणे, उघड्या स्पष्टपणे त्याचा शोध घ्यावा, तरच त्याचा प्रत्यय लाभ आहे.


धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

दोन आहेत देणे ईश्वराचे ||




|| जय जय रघुवीर समर्थ ||